बऱ्याच दिवसां नंतर आज , कविता मी लिहिणार आहे...! लेखणी तर मीच धरेल, कवितेची ओळ तू बनशील का...? ह्या दूर जाणाऱ्या मार्गी, एकलाच मी निघालो आहे...! पाय तर माझे असणार आहे, पायवाट तू होशील का...? इतके वर्ष भटकणाऱ्या मनाला, आज कुठे थांबायाचे आहे...! सागराप्रमाणे आहे ते, तू किनारा बनून त्याला थांबवशील का...? पुरे झाले हे आता, माझे असे कोड्यात बोलणे...! मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय, तू सुद्धा फक्त माझीचं होशील का......??? © ® Ek प्रियकर ™