पाऊस... कधीच का बरसत नाही... एखादा रंग घेऊन...? कधी हिरवा कधी भगवा... तर कधी निळा होऊन... कारण पाऊस कधीच देत नाही... जात, धर्म, पंथ या वात्रट गोष्टिना थारा... पाऊस म्हणजे निखळ आनंद... अन् झोंबनारा गार वारा.... पाऊस बरसतो... निर्मळ, स्वछ, आनंदी... नेसवतो हिरवी शाल मातीला... अन् देतो एक वेगळीच शिकवण ... या मानव जातीला... पण काही चांगल शिकेल... तो माणूसच कसा...? ओरबाडण्याची वृत्ती त्याची... कृत्य दर्शविती आहेच दानव जसा...! मित्रहो... पाऊस खुप कही शिकऊन जातो... आपल अस्तित्व मीटवुण... इतरांसाथी जगण्याची प्रेरणा देतो... कितीही वादळ निर्माण झाले... लागल्या कितीही जाती धर्माच्या सरी... तरीही जगाल प्रेमाच्या भाषेवर... या प्रियकरची रचना संपते.. या एकाच आशेवर.... -Ek प्रियकर १७.०७.२०१५ रंग आषाढाचे २०१५ रोहा येथे झालेल्या कार्यक्रमात मी (Ek प्रियकर) ने सादर केलेली कविता... कवितेच शीर्षक को.म.सा.प ठाणे अध्यक्षांनी सुचवल आहे....