कुणाची तहान... भागलीच न्हाई...!
मुटभर दाण्यासाठी...
इतभर जमीन गहाण राही....!!
घोटभर पाण्यासाठी ...
जीव हा व्याकुळ होई....!
थेंबावीन पाण्याच्या...
फुटलेला अंकुर ही करपुन जाई...!!
तुझ्या अश्या रूसव्यान...
दुबार पेरणीच संकट येई...!
आधीच जगण होत असाह्य...
आता अजुनच बिकट होई...!!
बरस रे वसंता...
नको काळजास घोर लावु...!
कोमेजल्या फुलास या...
नको उन्हाचे आणिक चटके देऊ....!!
नको वागुस (बिनकाळजाच्या) नेत्यासरखा...
वेळ काढून घटकाभर येऊन जा...
भीकाऱ्याच्या ओंजळीत या...
मायेचा ओलावा देऊन जा...
सांग तू बरसशिल ना...?
पुन्हा एकदा निवांत...!
अन् अशांत, दुःखी मनास या....
करशील ना शांत....?
जगतोय... तू परतशील या आशेवर....
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment