आज पुन्हा वेदनांच वादळ सुटलयं,
सोबत भावनेचा धुराळाही उडाला,
पुन्हा या मनाच ते स्वप्न कुठतरी भटकलयं,
समजाऊन दमलोय या वेड्या मनाला..,
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला...
पुन्हा सतावती मला तुझ्या आठवणी,
पुन्हा त्या न संपणा-या रात्री,
बघ आलय आता या डोळ्यात पाणी,
आज पुन्हा तो वेदनेचा पाऊस बरसला,
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला....
-Ek प्रियकर
वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!! -Ek प्रियकर
Comments
Post a Comment