खूप दिवसांनंतर आज तुझा आवाज ऐकला,
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटलं, एकटेपणा संपला.!
तोच आवाज, तिच वाक्य, तिच बोलण्याची शैली,
जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली थैली,
वाटलं असंच तु बोलत रहावंस,
माझ्या कानांत गोड हसत रहावंस.!
तुलाही कदाचित वाटलं असेल पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,
मनात नसताना फोन ठेवला असेल,
अजुन बोलण्याची ईच्छा मनी नक्कीच असेल.!
वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची,
आठवण मला नेहमीच राहिल या क्षणांची, का देऊ मी उपमा याला इतर कशाची, माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची.!
इच्छा झाली होती काहीतरी विचारायची, तुलाही आवड होती काहीतरी ऐकायची, पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची, मनालाही आवड नव्हती अग्निपरीक्षेची.!
-Ek प्रियकर
वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!! -Ek प्रियकर
Comments
Post a Comment