राधा-कृष्णाच प्रेम महान
गाती लोक याचंच गुणगान
आज पण येथे प्रेमच बदनाम...
तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'...
विद्यार्थ्यांना शिक्षक हैरान...
शिक्षण वीकल जात खुलेआम
तरीही शिक्षकच होई बदनाम...
तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'...
दहा दहा रूपयाला विकला जातो ईमान
नेताच करतो.. नितिचा अपमान...
तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'...
'जय जवान जय किसान'... विसरले सारेच नारा महान
कर्ज गरीबीला त्रासुन.. शेतकरी देती बलिदान..
तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'...
वाढतो आहे हळू हळू प्रत्येकात शैतान...
भांडतात भाऊ भाऊ.. बनुन हिंदु मुसलमान...
तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'...
पोटात भूक भकरीची.. आणि ओठावर पाण्याची तहान
बेबस लाचार जनता... जगते मुठीत घेऊन प्राण
तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'...
-Ek प्रियकर
www.ekpriyakar.blogspot.com
Comments
Post a Comment