खर खुर सांगतो राव...
उगीच नाय ठेवणार नाव...!
या मोबाईल नेच बिघडवलाय...
माझा आदर्श गांव...!!
वडाचा मोठा पार होता...
वारा थंडगार होता...!
कबड्डी होती कुस्ती होती...
उनाडक्या होत्या मस्ती होती...!!
चिंचा होत्या, होती बोरं...
गोठे होते, गोठयात होती ढोरं...!
येता कठीण काळ...
जिवाला जीव देणारी होती पोरं...!!
नाच होता भजनं होती...
ओठावर पारंपरिक गाण होत...!
शाळेतल्या कवितेला
आनंदाचं उधान होत...!!
जसं गावात आल हे संकट...
आला मोबाईल, आल 3G नेट...!
तस चँनलच कनेक्शन...
पोहोचला घरा घरात थेट...!!
गजबजलेलं गाव माझे...
आता निर्जन झाले बेट...!
वर्दळ करणारी माणसे
टी वी पुढं झाले सेट...!!
सुनेसुने झाले वडाचे पार...
मुके झाले देवळाचे ओटे...!
दिवसभर आता मोबाईल...
नुसतिच फिरत राहतात बोटे...!!
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment