काय रे दादा... तूच किती सादर करशील... तुझ्या कविता...? एखादी मलाही दे ना लिहून...आमच वार्षिक स्नहे संमेलन आहे...
मग मीही चार लाइन खरडल्या आणि दिल्या तिला... म्हणल ही घे...
ती वाचल्यावर म्हणते कशी... ही अशी नको ना रे... दूसरी दे...
मी तिला थोड़ समजावल... काव्य वाचनाची पद्धत सांगितली... मग तिही तीच कविता सादर करायला तयार झाली...
अखेर कार्यक्रम सुरु झाल... कार्यक्रमच्या अगदी शेवटला "प्रणाली जनार्दन म्हसकर" अस नाव घेतल... कविता सुरु झाली... कविता ती सादर करत होती पण काळीज माझ धड़ाडत होत... पहिल्या कडव्यालाच टाळ्यांचा कड़कडाट झाला अन् हायसे वाटले...
कविता सुरूच होती पण टाळ्यांचा वेग आता मंदावला होता... मी प्रेक्षकांकडे नजर फिरवली... साऱ्यांचे डोळे पाणावले होते... अगदी शिक्षकही...राजकीय नेत्यांना रडवण अवघडच पण त्यांचेही डोळे पाणावले होते...पाणावलेल्या पापण्यांनी मिळालेली दाद पाहून मीही भारावलो होतो... तीच तर माझ्यासाठी माझ्या लेखनीला पावती होती...
कविता संपली अन् टाळ्यांचा कड़कडाट झाला... बक्षिसांचा ही वर्षाव झाला... आजच्या घडीची मोठी नोट बक्षीस म्हणून मिळाली होती... बक्षीस काय दिल हे महत्वाच नव्हतच... बक्षीस मिळवणारी ती पहिलीच होती....
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment